Pages

हार्दिक स्वागत

http://picasion.com/gl/8bzq/
#### मंगेश वानखडे स. शिक्षक, शाळा हातगाव , पं. स. ,दारव्हा जि. यवतमाळ मो.नं. ९७६४२७३२०९ तर्फे हार्दिक स्वागत ! 🙏🙏💐🙏🙏@@@@ सोबतच माझ्या MANGESH KID-TECH By Mangesh Wankhade या You Tube Channel ला भेट देऊन शाळेचे विविध उपक्रम पहा व Channel subscribe करा ####

Online Updates

*** blog ला भेट देणाऱ्या सर्वांचे हार्दिक आभार!! 🙏🙏 *** ----------------���� Thank you 🙏🙏 ..... Visit again for more information.. 🙏🙏 ���� -------- ..... ....---

भगवान महावीर्



वर्धमान महावीर (इ.स.पू ५२७ - इ.स.पू ५९९) हे जैन धर्माचे २४ वे व शेवटचे तीर्थंकर होते. महावीराचे मूळ नांव वर्धमान होते. त्यांचा जन्म कुंदग्राम या वैशालीच्या उपनगरात झाला. त्याच्या वडिलांचे नांव सिद्धार्थ तर आईचे नांव त्रिशला होते. महावीराच्या जन्मासंबंधीच्या अनेक आख्यायिका जैन धर्मग्रंथात सांगितल्या आहेत. कल्पनासूत्र नावाच्या ग्रंथात वर्धमानाच्या जन्मोत्सवाची व त्यावेळी घडलेल्या घटनांची माहिती आहे.वर्धमानाचे बालपण ऐषाआरामात गेले. त्याचा विवाह यशोदा नावाच्या एका सुंदर स्त्रीशी झाला होता त्यास प्रियदर्शिनी नावाची मुलगीही होती. महावीराची विचारधारा ही चिंतनशील असल्याने राजघराण्यातील भौतिक वैभव त्यास अधिक काळ आकर्षित करू शकले नाही. संसाराचे आकर्षण त्याच्या मनात निर्माण होऊ शकले नाही.त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूमुळे तर तो अधिक विरक्त झाला. ऐहिक सुखाबद्दल त्याच्या मनात उरलेसुरले जे आकर्षण होते तेही कमी झाले. मानवी जीवनातील दु:ख हे सुखापेक्षाही अधिक आहे याची तीव्र जाणीव त्याला झाली. दु:ख कमी करण्याचा काहीतरी मार्ग शोधला पाहिजे असे त्याला वाटायचे. आपले वडीलबंधू नंदीवर्धन यांची परवानगी घेऊन त्याने गृहत्याग केला.