वर्धमान महावीर (इ.स.पू ५२७ - इ.स.पू ५९९) हे जैन धर्माचे २४ वे व शेवटचे तीर्थंकर होते. महावीराचे मूळ नांव वर्धमान होते. त्यांचा जन्म कुंदग्राम या वैशालीच्या उपनगरात झाला. त्याच्या वडिलांचे नांव सिद्धार्थ तर आईचे नांव त्रिशला होते. महावीराच्या जन्मासंबंधीच्या अनेक आख्यायिका जैन धर्मग्रंथात सांगितल्या आहेत. कल्पनासूत्र नावाच्या ग्रंथात वर्धमानाच्या जन्मोत्सवाची व त्यावेळी घडलेल्या घटनांची माहिती आहे.वर्धमानाचे बालपण ऐषाआरामात गेले. त्याचा विवाह यशोदा नावाच्या एका सुंदर स्त्रीशी झाला होता त्यास प्रियदर्शिनी नावाची मुलगीही होती. महावीराची विचारधारा ही चिंतनशील असल्याने राजघराण्यातील भौतिक वैभव त्यास अधिक काळ आकर्षित करू शकले नाही. संसाराचे आकर्षण त्याच्या मनात निर्माण होऊ शकले नाही.त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूमुळे तर तो अधिक विरक्त झाला. ऐहिक सुखाबद्दल त्याच्या मनात उरलेसुरले जे आकर्षण होते तेही कमी झाले. मानवी जीवनातील दु:ख हे सुखापेक्षाही अधिक आहे याची तीव्र जाणीव त्याला झाली. दु:ख कमी करण्याचा काहीतरी मार्ग शोधला पाहिजे असे त्याला वाटायचे. आपले वडीलबंधू नंदीवर्धन यांची परवानगी घेऊन त्याने गृहत्याग केला.
Pages
- Home
- ग्रामगीता
- आणी सुखी व्हा
- अंधश्रद्धा व कार्य
- रजेचे नियम
- कविता साईट
- डॉक्टर बना
- कर्मचारी विमा योजना
- निरोगधाम पत्रिका
- परिसर अभ्यास
- L I C रजिस्ट्रेशन
- संचमान्यता
- स्वच्छ विद्यालय पुरस्कार
- मुख्यमंत्री व राज्यपाल
- दप्तराविना शाळा
- ABL
- समाज कल्याण शिष्यवृत्ती
- प्रगत शाळा निकष
- शाळासिध्दी
- GST म्हणजे काय?
- शिष्यवृत्या व लाभार्थी
- भारताचे शासक
- 5 वी & 8 वी शिष्यवृत्ती
- शालेय अभिलेखे
- आधार व पॅन कार्ड link
- Toll free नंबर
- INSPIRED AWARD
- अवकाश वेध
- HSC/SSC मार्कशिट
- शिष्यवृत्ती अर्ज /निकाल
- गुंठा व गाव नमुना
- EID वरून Adhaar मिळवा
- प्रभावी सूत्रसंचालन
- RTE- 2009
- MAHADBT-pdf
- प्रगत चाचण्या, वर्ग,विषय
- महिलांविषयक कायदे
- गॅस विमा
- भारतरत्न
- Update मतदार
- Computer चे shortcuts
- Voter Search
- समग्र शिक्षा निधी
- जगातील प्रसिध्द वृत्तपत्रे
- सर्व्हिस बुक online नोंदी
- सातवा वेतन आयोग निश्चिती
- संगीतमय परिपाठ महागाव क
- परिपाठासाठी छान गोष्टी
- आकारिक नोंदी व प्रश्नपत्रिका
- करीयरच्या वाटा
- LfW in 7 Days
- सगुण कार्यक्रम
भगवान महावीर्
वर्धमान महावीर (इ.स.पू ५२७ - इ.स.पू ५९९) हे जैन धर्माचे २४ वे व शेवटचे तीर्थंकर होते. महावीराचे मूळ नांव वर्धमान होते. त्यांचा जन्म कुंदग्राम या वैशालीच्या उपनगरात झाला. त्याच्या वडिलांचे नांव सिद्धार्थ तर आईचे नांव त्रिशला होते. महावीराच्या जन्मासंबंधीच्या अनेक आख्यायिका जैन धर्मग्रंथात सांगितल्या आहेत. कल्पनासूत्र नावाच्या ग्रंथात वर्धमानाच्या जन्मोत्सवाची व त्यावेळी घडलेल्या घटनांची माहिती आहे.वर्धमानाचे बालपण ऐषाआरामात गेले. त्याचा विवाह यशोदा नावाच्या एका सुंदर स्त्रीशी झाला होता त्यास प्रियदर्शिनी नावाची मुलगीही होती. महावीराची विचारधारा ही चिंतनशील असल्याने राजघराण्यातील भौतिक वैभव त्यास अधिक काळ आकर्षित करू शकले नाही. संसाराचे आकर्षण त्याच्या मनात निर्माण होऊ शकले नाही.त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूमुळे तर तो अधिक विरक्त झाला. ऐहिक सुखाबद्दल त्याच्या मनात उरलेसुरले जे आकर्षण होते तेही कमी झाले. मानवी जीवनातील दु:ख हे सुखापेक्षाही अधिक आहे याची तीव्र जाणीव त्याला झाली. दु:ख कमी करण्याचा काहीतरी मार्ग शोधला पाहिजे असे त्याला वाटायचे. आपले वडीलबंधू नंदीवर्धन यांची परवानगी घेऊन त्याने गृहत्याग केला.
Subscribe to:
Posts (Atom)